महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक निर्णयाचे समीर शफी पठाण यांच्याकडून स्वागत; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे अभिनंद

Nagrik Express 24x7 | Mumbai | प्रतिनिधी

MAHARASHTRA

Desk

2/23/20261 min read

महाराष्ट्रातील नागरिकांना अधिक व्यापक आणि पारदर्शक आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन, मुंबई येथे TMS 2.0 (Transaction Management System) या अद्ययावत संगणक प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

ही प्रणाली “Ayushman Bharat Yojana” आणि “Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana” या दोन महत्त्वपूर्ण योजनांचे एकत्रीकरण करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली ही यंत्रणा २४ फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्रीपासून राज्यभर कार्यान्वित होणार असल्याची माहिती देण्यात आली.

उपचारांची संख्या वाढ

या निर्णयामुळे नागरिकांना उपलब्ध असलेल्या मोफत उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढली आहे. तसेच, अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४५३७ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांना अधिक सुलभतेने उपचार मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक प्रक्रिया

TMS 2.0 प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून ते रुग्णालयांच्या दाव्यांपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. बायोमेट्रिक पडताळणीद्वारे पात्र लाभार्थ्यांना तात्काळ सेवा देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, ५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या गंभीर उपचारांसाठी स्वतंत्र ‘कॉर्पस फंड’ची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

समीर शफी पठाण यांची प्रतिक्रिया

नागरिक आरोग्य सहाय्यता कक्षाचे संस्थापक अध्यक्ष समीर शफी पठाण यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे अभिनंदन केले.

यावेळी ते म्हणाले,
“उपचारांची वाढलेली संख्या, वाढलेली रुग्णालये आणि पारदर्शक डिजिटल प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळेल. पुणे शहरात ‘नागरिक आरोग्य सहाय्यता कक्ष’च्या माध्यमातून आम्ही या योजनांविषयी मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देत राहू.”

त्यांनी पुढे नमूद केले की, पात्र रुग्णांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील.

🗓️ २३ फेब्रुवारी २०२६
📍 विधान भवन, मुंबई

(नागरिक एक्सप्रेस 24x7 साठी विशेष वृत्त)